Thursday, May 24, 2012

वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा


आरक्त देखिली डोळा ग्रासिले सूर्यमंडळा ||

वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा ||

व्हायचा तो कहर झालाच. १-१ पायरी वर चढत सामान्य जनतेची गळचेपी करू पाहणारया सरकारने आज शेवटी एकदाची उंच भरारी घेतलीच.

१-२ रुपयांनी होणारी पेट्रोल वाढ काल चक्क ७.५० रुपयांनी झाली. आपल्या मेहनतीचा १-१ रुपया वाचवण्यासाठी जो तो काल २-२ तास पेट्रोल पंपावर रांग लावून उभा होता. पण जिथे सरकारलाच आपल्या जनतेशी काही देणं-घेणं नाही तिथे इतर कुणी कशाला पर्वा करणार.
त्यामुळे आपल्या अतिशहाण्या पंपधारकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी पंप काल संध्याकाळी ६ वाजताच बंद केले.

मागच्या ३ वर्षात आपल्या नेत्यांना भरपूर खायची सवय झाल्यामूळे त्यांची भूक दिवसेंदिवस वाढतेच आहे. आपली भूक शमवण्यासाठी आपले हे पुढारी so called नेते
सामान्य जनतेचे खिसे अक्षरशः कापून काढत आहेत.
आज सरकारला सत्तेवर येऊन ३ वर्ष पूर्ण झालीत आणि ह्या ३ वर्षात आपण जनतेला भरभरून दिलं असा काहीतरी समज करून घेउन हे जणू जनतेकडून return gift वसूल करत आहेत.
ह्यांच्यापेक्षा तर ते दरोडेखोर परवडले जे निदान बंदूकीचा धाक दाखवून आपल्याकडून पैसे घेतात पण आपले हे नेते ज्यांना आपणच मतं देऊन सत्तेवर बसवलं ते मात्र स्वतःचा बंगला बांधण्यासाठी आपल्याला झोपडीचा रस्ता दाखवत आहेत.

ह्यांनी चालवलेल्या या महागाई मेळाव्यात सामान्य माणसाचा टिकाव कसा लागणार??
आज पेट्रोल आवाक्याबाहेर गेले तेव्हा सामन्य माणसाने गरजेपुर्तीच गाडी वापरण्याचा संकल्प केला.
आजच्या वृत्तपत्रात ठळक बातमी काय असणार ह्याची सगळ्यांना आधीच कल्पना होती. पण आज एकदाची बातमी वाचली आणि पोराला ऑफिसला जायला गाडी आवश्यक तेव्हा मी किराणा आणायला पायी जातो हे प्रत्येक मध्यमवर्गीय बापाने सकाळी घरात आपल्या मनाशी पक्के केले असणार.
उद्या सिलेंडर आवाक्याबाहेर जाईल तेव्हा हे माय बाप आपल्या पोराला पोटभर खाऊ घालण्यासाठी,त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस जेवायलाही मागे पुढे बघणार नाहीत.

आज शेतकरी आत्महत्या करतो आहे उद्या मात्र महागाई ह्या रोगाने ग्रासलेला सामान्य माणूसही हेच पाउल उचलेल.
पण सरकारला त्याची पर्वा कुठे?? सरकारला तर आपले खिसे भरण्याशी मतलब.

गुलामगिरीने ग्रासलेल्या भारताला वाचवण्यासाठी गांधी,टिळक,सावरकर,आझाद,भगतसिंग सगळे एकत्र आले.
पण आज भ्रष्टाचार,महागाई ह्यांनी पोखरल्या जाणारया,अवनती कडे झुकणारया या भारताला कोण वाचवणार??

म्हणतात ना बाहेरच्या शत्रूशी २ हात करणं सोपं असतं पण परिस्थिती जर "घर का भेदी लंका ढाये" अशी असेल तर मात्र कठीण होउन बसतं.

पण १ दिवस चिडचिड करणं, लिहून बोलून आपल्या मनातली भडास काढणं यापलीकडे सामान्य माणूस करू तरी काय शकतो?
फक्त या नेत्यांच्या साचलेल्या चिखलात एखादा कमळ उमलण्याची वाट बघू शकतो.

When we are sick, we want an uncommon doctor; when we have a construction job to do, we want an uncommon engineer, and when we are at war, we want an uncommon general. It is only when we get into politics that we are satisfied with the common man. -- Herbert Hoover



1 comment:

  1. Win Exciting and Cool Prizes Everyday @ www.2vin.com, Everyone can win by answering simple questions. Earn points for referring your friends and exchange your points for cool gifts.

    ReplyDelete